शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे, मुंबई परिसरात चरसची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक: चार किलो चरस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 19:59 IST

नवी मुंबईतून ठाण्यात मोटारसायकलीवरुन चरसची विक्री करण्यासाठी आलेल्या समीर शेख याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाई आठ लाख ५३ हजारांचा ऐवज जप्तऐरोलीच्या एसटी वर्कशॉप येथे सापळा लावून केली कारवाई

ठाणे: मुंबई, ठाणे परिसरात चरसची विक्री करणा-या समीर आलम महंमद शेख (२२, रा. जुहू गाव, नवी मुंबई), व्यंकट काळे (२२, रा. महापे गाव, नवी मुंबई) आणि अस्लम रियाजुद्दीन अन्सारी (३४, रा. नवी मुंबई) या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथक आणि युनिट एक यांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आठ लाख ५३ हजारांंचे चार किलो चरस हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी मंगळवारी दिली.ऐरोली नवी मुंबई कडून कळवा मार्गाकडे रस्त्यावरुन दोघेजण चरस हा अमली पदार्थ विक्र ी करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे पोलीस हवालदार रवींद्र काटकर यांना ८ जून रोजी मिळाली होती. याच माहितीच्या आधारे युनिट एक आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला, अपर पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली कळवा रोडवरील एसटी वर्कशॉप येथे सापळा लावला. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या समीर शेख आणि व्यंकट काळे या दोघा संशयितांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांच्या पथकाने ताब्यात घेतले. या दोघांच्याही अंगझडतीमध्ये त्यांच्या जवळील दुचाकीमध्ये प्रत्येकी दोन असा एकूण चार किलो चरस हस्तगत केला. त्यांना अटक करीत त्यांच्याकडील चरस, दुचाकी, मोबाईल फोन असा आठ लाख ५३ हजार १५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे देवराज यांनी सांगितले. नवी मुंबई येथील खैरणेगाव येथील अस्लम अन्सारी याने हा चरस पुरवठा केल्याचे दोघांच्याही चौकशीत समोर आले. ही माहिती समोर आल्यानंतर अन्सारी यालाही अटक करण्यात आली. तिघांनाही १४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी